मुंबई : लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत ३० मदत केंद्रे कार्यरत करण्यात आली असल्याने मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होत आहे.
१९५० या हेल्पलाइनवर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. २४ तास कार्यरत असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.